आशाताई बच्छाव
एस,टी,महामंडळातील,धुळे विभागाचा भोंगळ कारभार बस मागणीसाठी दिलेल्या पत्राचे काय? शिक्षणापासुन वंचित असलेल्या विध्यार्थ्यांचे होताय हाल , अजुनही विभाग प्रमुखांचे डोळे बंद,चालु बस होतातच का बंद – दिपकभाऊ जाधव
वासखेडी – येथील रयत जनरल कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपकभाऊ जाधव यांनी विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करत गेल्या मागील काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता,त्यांनी अश्वासन देवुन देखील बस चालु झालीच नाही, शिंदखेडा आगाराची शिंदखेडा – सुरत ही बस लामकानी ,निजामपुर ,वासखेडी या मार्गाने सुरळीत चालु असतांना प्रवाशांचा खुपच मोठा प्रतिसाद देखील मिळत होता परंतु ऐन लग्न सीजन च्या वेळीस बस बंद करण्यांत आली परंतु पत्र व्यवहार करून देखील ती चालुच झाली नाही,नंतर माळमाथा परीसरातील प्रवासी व विध्यार्थ्यांच्या विध्यालयातील शिक्षणासाठी निजामपुर येथे जाण्यासाठी मी मागणी केलेली पिंझारझाडी बस पत्राच्या समाधानासाठी साक्री आगार प्रमुख यांनी सदरील बस चालु केली परंतु सुरळीत बस चालु झाली ,विध्यार्थ्यांनी बस सुरळीत चालु झाली म्हणुन पासेस काढली नंतर बस गुलच झाली,परीसरातील मुले शिक्षणापासुन वंचित राहु नयेत म्हणुन मी विभाग प्रमुख व साक्री,शिंदखेडा आगार प्रमुखांशी देखील विचारणा करून पत्रव्यवहार केला परंतु कोणताही प्रतिसाद न देता केलेल्या पत्रव्यवहाराचे काय झाले? चालु झालेल्या बस चालक वाहकांना परीसरातुन सहकार्य ही मिळत होते मग बस बंदच का झाल्या अशा संतप्त प्रतिक्रिया आता प्रवासी वर्गाकडून येऊ लागल्या,विभाग प्रमुखांचे डोळे बंद च का?चालु बस होतेच बंद का? सरवड ते सुरत या महामार्गावरून अनेक प्रवासी प्रवास करता परंतु लालपरी नसल्याने खुप मोठ्या प्रमाणावर त्यांचे हाल होतांना दिसताय,दिलेल्या पत्रव्यवहाराचे कोणतेच उत्तर देखील अजुन मिळालेले नाही,जर येत्या काही दिवसात सदरील बसेस चालु न झाल्यास विभाग प्रमुख कार्यालया समोर निदर्शने करण्यांत येतील असा थेट इशारा रयत कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपकभाऊ जाधव यांनी केला आहे…