आशाताई बच्छाव
चांदवड तालुक्यात वनविभागाच्या अधिका-यांकडून आदिवासींवर अन्याय
चांदवड,(सुनील गांगुर्ड् प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– नाशिकच्या चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या गौरुण भागातील आदिवासी बांधवावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याची तक्रार आदिवासी बांधवानी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करुन चौकशीची मागणी केलेली आहे.
याबाबत सविस्तर प्राप्त माहिती अशी की,गौरुण, ता.चांदवड भागातील आदिवासी बांधव वर्षानूवर्षा पासून वनविभागाच्या जमिनीवर शेती कसून उपजीविका भागवितात.या ठिकाणच्या आदिवासी बांधवाकडे त्या जमिनी कसत असल्याबाबत सातबारा उतारे देखील आहेत.त्यामुळे या जागेवरील वहितीच्या जमिनी आदिवासी बांधव कसत असून,या ठिकाणी आदिवासींनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन,मका,भुईमुग आदी पिकांची लागवड केलेली असून,वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २६ आँगस्ट २०२३ रोजी सायंकाळी आदिवासी बांधवाना कुठलीही कल्पना न देता किंवा नोटीशी न देता दंडेलशाही मार्गाने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आदिवासी बांधवाच्या उभ्या पिंकाचे नासधूस करुन चा-यांचे दांडगाईने खोदकाम केले.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्या आदिवासी बांधवाना धक्काबुक्की करुन तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली.अगोदरच संपूर्ण महाराष्ट्रवर दुष्काळाचे सावट असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अगदी हिटलरशाही पध्दतीने आदिवासींच्या पिकपाण्याचे केलेली नासधूस निंदनीय असून,शासनाने तात्काळ आदिवासी बांधवाना दिलासा देऊन वनविभागाने केलेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी आदिवासी बांधवानी केली आहे.