आशाताई बच्छाव
कातरणी ते श्री क्षेत्र नस्तनपुर येथे पायी दिंडीस प्रारंभ
दैनिक युवा मराठा
लक्ष्मण आवारे चांदवड
गत १५वर्षापासुन अखंड सुरु असलेली पायी दिंडी याही वर्षी मोठ्या उत्साहात नस्तनपुर कडे बुधवारी प्रस्थान केले, अनेक समस्या ग्रस्त असलेल्यांना व अनेकांचे स्वप्न ,इच्छा आकांशा व नवसाला पावणा-या शनि महाराज यांच्या दर्शनाला अनेक अबालवृद्धांना घेऊन, दिडीं चालक मधुकर सहादु कदम, रावसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ,१५वर्षापुर्वी ३० शनिभक्तांपासुन सुरुवात झाली, आज या दिडींत ३५० भाविक चालत आहे, कातरणी येथे विठ्ठल मंदिर येथे सर्व शनिभक्त विठ्ठलाचे अभंग घेऊन शनि महाराज यांचा नामघोष करत रामदास वैराळ यांच्या वस्ती वर महाप्रसाद पंगत आटोपुन वडगाव मार्गे केकानवाडा ,मनमाड येथे महाप्रसाद व मुक्काम असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी नास्ता आटोपुन हिसवळ येथील रघुनाथ करवर यांचे येथे मुक्काम व पंगत असते,तिसर्या दिवशी नांदगाव येथील जितेंद्र सुदाम सरोदे मंगलकार्यात मुक्कामी असलेल्या सर्वांना महाप्रसाद देतात, चवथ्या दिवशी शनिवारी, श्री क्षेत्र नस्तनपुर येथे सकाळी दिंडी चे आगमन होऊन चांदोरा येथील भजनी मंडळ यांच्या सौजन्याने, हभप भावराव महाराज पवार (जोधंळवाडी) यांचे सकाळी ११वाजता काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल,या दिंडी सोहळ्यात नवनाथ वैराळ,चंद्रभान कोल्हे, आत्माराम कोल्हे, उत्तम दरगुडे, माधव कदम, धोंडु रसाळ, भागवत नवले, दिलीप गोजरे व शेजारील गावातुन आलेले अनेक भाविक पायी चालत आहे, दिंडी प्रस्थान च्या वेळी, लक्ष्मण कदम, सामाजिक कार्यकर्ते विजय कुऱ्हाडे, भावराव शेठ, अनिल कदम, दादा पांडुरंग कदम, सचिन महाराज, जनार्दन महाराज, निवृत्ती महाराज, तुकाराम कोल्हे, शिवाजी कदम, रंगनाथ झाल्टे, नामदेव कदम हे उपस्थित होते,