आशाताई बच्छाव
रखडलेल्या उर्वरित अतिवृष्टी निधीचा नवनिर्वाचित संग्रामपूर तहसीलदार यांचा पाठपुरावा
विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपुर तालुक्यामध्ये संग्रामपुर, सोनाळा, बावणबीर महसूल मंडळामध्ये सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झालेली होती. अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्याचे शासकीय स्तरावरून पंचनामे करण्यात येवुन शासनास अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार शासन स्थरावरून नुकसान बाधीत शेतक-यांना ऑनलाईन पध्दतीने अनुदान वाटपाची प्रक्रीया सुरु झालेली असून ब-याच शेतक-यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे.परंतु अदयापही या तीन मंडळामध्ये जवळपास 4150 बाधीत शेतक-यांनी आपले आधार कार्ड, बैंक पासबुक इत्यादीची झेरॉक्स प्रत व मोबाईल नंबर पंचनामे करणा-या किंवा यादया तयार करणा-या तलाठी/ ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या कडे दिले नसल्याने ते अनुदाना पासून वंचीत आहेत. पंचनामा करणारे सर्व संबंधीत कर्मचारी यांनी वारंवार पाठपुराव करुन सुध्दा 4150 बाधीत शेतक-यांनी अनुदान मिळण्यासाठी आवश्यक असलेली माहीती पुरविलेली नाही.तरी संबंधित शेतकऱ्यांना संग्रामपूर तहसीलदार श्री योगेश्वर टोम्पे यांच्या वतीने जाहीर आव्हाण करण्यात येते की, संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बैंक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नं.
इत्यादी ज्या कर्मचा-यांनी आपल्या गावाच्या यादया तयार केल्या आहेत त्यांच्याकडे दिनांक 21/6/2023
या कालावधीपर्यंत देण्यात यावे. विहीत मुदतीत आपली माहीती संबंधीत कर्मचा-याकडे न आल्यास त्या नंतर आपण अनुदानापासून वंचीत राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, तसेच अनुदान वाटप हे ऑनलाईन पध्दतीने होत असल्याने प्रतेक खातेदाराने आपले आधार कार्ड आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अपडेट करून घ्यावे. व अधार कार्ड, मोबाईल नं. आपल्या बँक खात्याशी संलग्न करून ध्यावेत. त्याशिवाय अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा होणार नाही.