Home नाशिक व-हाणे प्रकरणात चौकशी समितीचा निव्वळ दिशाभूल करणारा फार्स-राजेंद्र पाटील राऊत

व-हाणे प्रकरणात चौकशी समितीचा निव्वळ दिशाभूल करणारा फार्स-राजेंद्र पाटील राऊत

133
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230530-212826_All-PDF-Reader.jpg

व-हाणे प्रकरणात चौकशी समितीचा निव्वळ दिशाभूल करणारा फार्स-राजेंद्र पाटील राऊत मालेगांव,(विजय चांदणे प्रतिनिधी)-गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार व पाणपोई जागेच्या प्रश्नावर नेमलेल्या चौकशी समितीने फक्त दिखावा म्हणून व व-हाणेतील हाँटेलावर पार्ट्या झोडण्याच्या हेतूने निव्वळ फार्स रंगविला असल्याचा आरोप आज युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी नाशिकच्या सी.ओ.यांच्याकडे लेखी तक्रारीतून सादर केला आहे. व-हाणेतील पत्रकार भवन व पाणपोई जागेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतानाच चौकशी समितीचे अध्यक्ष तथा नांदगावचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत खोटा व लबाडीचा चौकशी अहवाल तयार केला.अवघा १ पानाचा अहवाल तयार करण्यासाठी संपूर्ण महिना वाया घालवला.त्याशिवाय तीन वर्षापासून सुरु असलेल्या आंदोलनाची व संघर्षाची कुठलीही फिकीर न करता सदरच्या प्रकरणी गुन्हे दाखल करणे,व संबधितावर कारवाई करण्याचे अधिकार हे मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचे असल्याचे स्पष्ट मत चौकशी अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.मग हा चौकशीचा निव्वळ फार्स व स्टंटबाजी कशासाठी?असा सवाल उपस्थित करीत युवा मराठाचे राऊत पाटील यांनी याप्रकरणी आता सगळ्यांनाच न्यायालयात घेऊन जाणार असल्याचे शेवटी सांगितले.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते कोल्हापुर येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी रवाना .
Next articleएटापल्ली येथील आविका संस्थेवर आविसं (अजयभाऊ कंकडालवार) गटाचा झेंडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here