Home पालघर जोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही तोपर्यंत एकही शिक्षक सोडणार नाही

जोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही तोपर्यंत एकही शिक्षक सोडणार नाही

99
0

आशाताई बच्छाव

IMG-20230530-WA0045.jpg

जोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही तोपर्यंत एकही शिक्षक सोडणार नाही

पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नासंदर्भात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून जोपर्यंत शिक्षकभरती केली जात नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीने एकही शिक्षक सोडणार नाही, तसेच शिक्षकांच्या बदलीसाठी पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आरोप काही वृत्तवाहिन्यांनी केले असले तरी हे आरोप बिनबुडाचे असून असे काहीही घडलेलं नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे.

आज दिनांक३०
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

उपाध्यक्ष पंकज कोरे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

जलजीवन मिशन मधील जी कामे पूर्ण झालेली आहेत त्याच कामांची बिले अदा केली असून कुठल्याही ठेकेदाराला आगाऊ रक्कम देण्यात आलेली नाही असे देखील अध्यक्ष निकम यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनुकम्पा भरती प्रमाणे ग्रामपंचायत मधील १०% भरती देखील लवकरच करण्यात येणार असून हातपंप कर्मचारी कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी पत्रकारांना दिली.
तसेच वेळोवेळी पत्रकारांनी जागृत केल्यामुळे जिल्हा परिषदेचा जास्तीत जास्त निधी खर्च करून यावर्षी जिल्हा परिषद दायित्वात राहिली नाही असे सांगून उपस्थित पत्रकारांचे आभार व्यक्त केले.
वाचन लेखन प्रकल्प,तालुक्यातील आढावा बैठका, बायोमेट्रिक हजेरी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य असणे, व इतर अनेक नवीन उपक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून सुरू केले आहेत ने यापुढेही नियमितपणे सुरू राहतील, असे प्रतिपादन अध्यक्ष निकम यांनी केले.
यावेळी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous articleरस्ता साईटपट्टी सुधारीकरणाच्या नावाखाली करोडोची मलमपट्टी!!!
Next articleलढवय्या नेतृत्वाचा दुःखद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा – माजी मंत्री, आ.वडेट्टीवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here