आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल—
शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून केली फसवणूक
दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे
विमा कंपनीने कमी नुकसान दाखवत परस्पर पाहणी अहवाल तयार करून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केल्याने संबंधित कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खेडलेझुंगे येथील शेतकरी रामेश्वर शांताराम शिंदे व इतर ३ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे माहे ऑगस्ट २०२२ रोजी नुकसान झाले होते. त्यांनी सदर कंपनीचा पीकविमा काढलेला असल्याने त्यांनी संबंधित कंपनीस नुकसानी बाबत कळवले होते. भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री पीक योजना ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकविलेल्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून राबविली जाते. त्यासाठी एच.डी.एफ.सी.ऍग्रो या कंपनीने ग्लोबल या कंपनीला नाशिक जिल्ह्याचे सर्व्हे करण्याचे काम दिले होते. मात्र कंपनीचे संदीप प्रभाकर पावडे, क्षेत्रीय कर्मचारी सर्व्हेक्षण अर्क कंपनी, पिंप्री महिपाल, नांदेड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता परस्पर विहित नमुन्यातील फॉर्म भरला. त्यात त्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात झालेल्या नुकसानी पेक्षा कमी नुकसान दाखवले. त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या न घेता खोट्या सह्या करून शेतकरी व कृषी सहाय्यकाची दिशाभूल करून त्यावर कृषी सहाय्यक यांची सही घेऊन संबधित शेतकरी व कृषी विभागाची फसवणूक केली म्हणून फिर्यादी दीपक नानासाहेब सोमवंशी (वय ३७) यांचे फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाणे येथे सी.सी.टी.एन.एस गु.र.न.११५/२०२३ भा.दं.वि.४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.