Home रत्नागिरी गणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले “श्रीं” चे स्पर्श दर्शन

गणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले “श्रीं” चे स्पर्श दर्शन

104
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0014.jpg

गणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले “श्रीं” चे स्पर्श दर्शन                                                        रत्नागिरी,(सुनील धावडे)

जागतिक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी श्रीं चे स्पर्श दर्शन घेतले. गणपतीपुळे येथील श्रीं च्या मंदिरात बुधवारी श्री गणेश चतुर्थी निमित्त वर्षातून एकदाच साध्या वेशात स्पर्श दर्शन मिळते. यामुळे बुधवारी श्रीं च्या स्पर्श दर्शनासाठी ग्रामस्थ व भाविकांनी रात्री एक वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. परंतु मंदिर पहाटे तीन वाजता उघडण्यात येऊन मंदिरामध्ये श्रीं ची पूजा अर्चा मंत्रपुष्प आरती होऊन श्रींचे मंदिर सर्व भक्तांसाठी पहाटे 4:30 वाजता स्पर्श दर्शनासाठी उघडण्यात आले.

यावेळी गणपतीपुळे सह परिसरातील मालगुंड, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर ,भंडारपुळे, नेवरे आदी परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी गर्दी केलेली दिसून येत होती.यावेळी सर्व भाविकांनी दर्शन रांगेत उभे राहून स्पर्श दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी दर्शनासाठी आलेल्या सर्वच भाविकांना रांगेतून व्यवस्थित दर्शन होण्यासाठी देवस्थान कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मंदिराचे पुजारी यांनी विशेष मेहनत घेतली गणपतीपुळे मंदिरामध्ये श्रीं चे स्पर्श दर्शन दुपारी 12:30 वाजता बंद करण्यात आले. यानंतर श्रींची आरती होऊन श्रीं च्या समोर फुलांच्या पाकळ्यांपासून सुबक अशी आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी काढली. तसेच बुधवारी श्री गणेश चतुर्थी निमित्त श्रींच्या मंदिरात गणपतीपुळे येथील केदारवाडी व मानेवाडी यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला.

गणपतीपुळे येथे ‘एक गाव एक गणपती ‘ही पाचशे वर्षांपूर्वींची परंपरा अजून ही जोपासली जात असून गणपतीपुळे येथे घरोघरी गणपतीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा नाही. श्रीं च्या मंदिरातील गणपती हाच आपला घरचा गणपती मानला जात असल्याने घरोघरी गौरी आणण्याची प्रथा आहे.

Previous articleरत्नागिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप
Next articleपहिली स्वदेशी INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here