Home रत्नागिरी रत्नागिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप

रत्नागिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0012.jpg

रत्नागिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप

रत्नागिरी,(सुनील धावडे) : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना रत्नागिरीत भक्तीभावात निरोप देण्यात आला. जिल्ह्यात दहा हजारहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

बुधवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले. जिल्ह्यात 114 ठिकाणी सार्वजनिक आणि 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू झाली. गुरुवारी दुपारनंतर दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. अतिशय शांततेत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन स्थळी आगमन होत होते. त्याठिकाणी गणपतीबाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleनळपाणी योजनेचे सुपरवायझर आनंदा मुळये ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त
Next articleगणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले “श्रीं” चे स्पर्श दर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here