आशाताई बच्छाव
रत्नागिरीत दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप
रत्नागिरी,(सुनील धावडे) : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना रत्नागिरीत भक्तीभावात निरोप देण्यात आला. जिल्ह्यात दहा हजारहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
बुधवारी गणपती बाप्पांचे आगमन झाले. जिल्ह्यात 114 ठिकाणी सार्वजनिक आणि 1 लाख 66 हजार 140 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू झाली. गुरुवारी दुपारनंतर दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. अतिशय शांततेत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन स्थळी आगमन होत होते. त्याठिकाणी गणपतीबाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.