आशाताई बच्छाव
देगलूर मध्ये मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी
देगलूर प्रतिनिधी गजानन शिंदे युवा मराठा नूज नेटवर्क
देगलूर शहरात गेल्या अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षाला मुस्लिम समाजाचा व तसेच मुस्लिम कार्यकर्त्यांचा फार मोठया प्रमाणात सहकार्य मिळाला आहे पण या गोष्टीचे आता काँग्रेस पक्षाला विसर पडले की काय? या मोठ्या नेत्यांना व तसेच अद्यावत असलेल्या आमदार यांना मुस्लिम नेते आता आठवत नसेल की काय ? किंवा या ठिकाणी मुस्लिम नेत्यांची गरजच नाही असं वाटत असेल म्हणूनच काही मोजक्या नेत्याना या जनता दरबार मध्ये बोलवले गेले पण एकही मुस्लिम नेत्याला बोलवणे आले नाही.मागे सुद्धा अशीच चूक काँग्रेस पक्षा तर्फे झाली होती मोठं मोठ्या बॅनर्स व होर्डिंग वरती सुद्धा एका ही मुस्लिम नेत्यांचे फोटो किंवा नाव टाकण्यात आले नव्हते आणि नुकत्याच या झालेल्या जनता दरबार मध्ये सुद्धा एका ही मुस्लिम नेत्याला किंवा कार्यकर्त्याला निमंत्रण नाही की लिस्ट मध्ये साधं नाव सुद्धा देखील नाही सध्या सर्व मीडिया वरती या गोष्टीवर्ती फार चर्चा होत असताना दिसून येत आहे आणि असे ही ऐकण्यात येत आहे की येणाऱ्या काळात सर्व मुस्लिम नेते जे करायचं ते बरोबर तेव्हाच करु आम्ही आणि आता या बद्दल उत्तर आत्ताच देणार नाही जेंव्हा वेळ येईल नक्कीच आम्ही त्यावर उत्तर देऊत असे ही मत मुस्लिम नेत्यांचे मीडिया वरती ऐकावयास व वाचायला मिळत आहे.यावरून असं वाटते की काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळात मुस्लिम नेत्यांचा हवा तितकं पाठिंबा मिळणार नाही आणि याचा सर्वात मोठा धोका काँग्रेस पक्षाला भोगावा लागणार की काय असेच चिन्ह दिसत आहे.म्हणूनच असं वाटते की मुस्लिम नेत्यांची काँग्रेस पक्षा बद्दल नाराजी आहे की काय?असं प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.