तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील घटना
नंदुरबार प्रतिनिधी :- गणेश (सागर)कांदळकर युवा मराठा न्यूज नेटवर्क
शेतकऱ्याचे नाव:- एकनाथ रामू पाटील
शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख-रांगोळी परी शिवार गट नं.7 शिवारातील तब्बल 10 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना देखील शॉर्टसर्किटमुळेच झाल्याचे समोर आले आहे. दुपारी 2 वाजेच्या सुमारास लक्ष्मण पाटील हे शेतात असताना त्यांच्या समोर विजेच्या तारा तुटल्या आणि त्यातूनच आगेची निर्मिती झाली आणि वाढता वाढता काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं, गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
पोषक वातावरणामुळे वाढले क्षेत्र
शहादा तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि खरिपात सोयाबीन हेच मुख्य आहेत. मात्र, यंदा पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी सर्वात मोठे असलेल्या (cash crop) नगदी पिकाची लागवड केली होती. शिवाय निसर्गाच्या लहरीपणाचा केवळ ऊसावर परिणाम झाला नव्हता. आता तोडणी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. मात्र, शॉर्टसर्किटमुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे. अंतिम टप्प्यात ऊस असल्याने पाचरटही वाळले असल्याने ही आग पसरली यामध्ये एकनाथ रामू पाटील ह्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे प्रयत्नही व्यर्थ
परी शिवारात दुपारच्या प्रहरीच आग लागल्याने तो विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांनी मात्र, वाळलेले पाचरट आणि वाऱ्यामुळे ही आग पसरली. दरम्यानच्या काळात ग्रामस्थांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे 2 वाजता लागलेली आग ही 3 च्या दरम्यान आटोक्यात आली. तोपर्यंत उभ्या ऊसाची राखरांगोळी झाली.