आशाताई बच्छाव
शिवकल्याण संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठया उत्साहात साजरा.
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)// सद्या स्थितीत मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. ते रोखले पाहिजे म्हणून दरवर्षी 1 ते 7 जुलै दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोशीएशन च्या वतीने चामोर्शी तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे वन्यजीव सप्ताह साजरा करून विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे मानवी आयुष्यातील महत्व या संदर्भात माहिती देण्यात आली. विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असून विद्यार्थ्यांवर योग्य वेळी योग्य संस्कार होणे काळाची गरज आहे हेच उद्देश पुढे ठेऊन शिवकल्याण संस्थेच्यावतीने नेहमी विद्यार्थी घडविण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नेहमी सांगितले जाते जेथे झाडे झुडे तेथे पाऊस पडे, पण झाडे आणि जंगले टिकवून ठेवायचे असेल तर वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून देखील तितकेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन शिवकल्याण संस्थेचे अध्यक्ष अनुप कोहळे यांनी केले ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी वालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरुण मडावी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वासेकर, प्रा. गायकवाड, प्रा. वडेट्टीवार, शिवकल्याण संस्थेचे सदस्य जितेश शेट्टीवार, नीरज कोहळे, गणराज चीचघरे, प्रतिष्ठित नागरिक रितेश कुकडकर सह मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी मोठया अवडणीने वन्यजीवांचे मानवी आयुष्यातील महत्व समजून घेतले. उपस्थित विद्यार्थ्यांना शिवकल्याण संस्थेच्या व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नोटबुक चे देखील वितरण करण्यात आले.