आशाताई बच्छाव
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे थोर विचारक
आमदार डॉक्टर देवरावजी होळी गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त पुष्पअर्पण करून केले अभिवादन
एक देश मे दो प्रधान ,दो निशाण नहीं चलेंगे असे म्हणत कश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग व्हावा यासाठी दिले बलिदान भारतीय जनसंघाचे संस्थापक, काश्मीर करिता आपल्या प्राणाचे बलिदान देणारे, थोर शिक्षण तज्ञ, कायदे पंडित, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे महान विचारक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे ओबीसी जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे , ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीकजी राठी सोनापूरचे उपसरपंच शेषराव कोहळे , पुरुषोत्तमजी बोरकुटे, यांचे सह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी डॉ मुखर्जी यांनी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यातच त्यांचे बलीदान झाले .
आज काश्मीर मध्ये 370 कलम रद्द झाले. परंतू त्याची पार्श्वभूमी ही डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानातून तयार झालेली आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या बलिदानाचा त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने काश्मीर मधील ३७० कलम रद्द केले . त्यांचे विचार आजच्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायक असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आदर्शमय कार्यकर्ता होण्यासाठी श्यामाप्रसादजींचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी याप्रसंगी केले.