आशाताई बच्छाव
बळीराजा सुखावला शेतकरी दुखावला
पावसाने दांडी मारल्याने पेरणी खर्च तब्बल 45 हजार रुपयांचे शेतकऱ्याचे अर्थिक नुकसान
युवा मराठा नयुज,वेब पोर्टल रविंद्र शिरस्कार,संग्रामपूर शहर
संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत बसलेले आहेत
त्याकरिता अनेक जण मोबाइलच्या साह्याने बळीराया चे आगमन तपासत असतात,मिडियावर पावसाचे हजेरी पाहतात तर अनेक ठिकाणी शेतकरी दगडाच्या पान देवाची स्थापना करुन देवाला साकडे घालत बळीराजाला निमंत्रण देण्यात तल्लीन झालेले आहेत.
हजारो रुपये खर्च करुन अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली मांत्र पावसाअभावी पिके सुकू लागल्याचे चित्र दिसत आहे वरवट बकाल येथील शेतकरी अर्जुन महादेव डाबरे यांच्या काकडवाडा शिवारातील सहा एकर शेतीत संतापुन त्यांनी सहा एक्कर सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवून पूर्ण पीक नंष्ट केले आहे
जून महिन्यात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उडीद,मूंग ,सोयाबीन ,व कापसाची पेरणी केली मांत्र संग्रामपूर तालुक्यात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके वाळत नसल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे पावसाने दांडी मारल्यामुळे ह्या तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला आहे वरवट बकाल जवळील काकडवाडा शेती शिवारातील अर्जुन महादेव डाबरे या शेतकर्याने पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन ,व तुरीची पेरणी केली होती पेरणीकरिता महागडे बियाणे खरेदी केले हाेते मांत्र पेरणी केल्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे पिके उगवली नसल्याने महादेव डाबरे यांनी पेरणी झालेल्या शेतात रोटाव्हेटर फिरविले वरवट बकाल येथील शेतकरी अर्जुन महादेव डाबरे या शेतकर्याचे जवळपास 45 हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे
जून महिन्यात मुबलक पाऊस झालेला नाही संग्रामपूर तालुक्यात खरीप हगामात ५० टक्के झाला परंतु पाऊस होईलचं या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरन्या केल्या मात्र त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे गत काही वर्षांपासून शेतकरीं वर्गांला वेगवेगळे संकटांना सामोरे जावे लागते, अस्मानी संकट येत आहेत मागील वर्षात सततधार पाऊस झाले,ऐनवेळी पीके कापणीला आलेली असतात, त्यामुळे मूग ,उडीद, सोयाबीन, कपाशीचे लगातार नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झालेले आहेत, शेतकरी हताश होऊन बसले आहेत.