आशाताई बच्छाव
चोरट्यांचा हात साफ तब्बल 3 दुकान फोडून 22500 रु मुद्देमाल लंपास
युवा मराठा नियुज रवींद्र शिरस्कार प्रतिनिधी संग्रामपूर शहर
काल दिनांक 24जून च्या रात्रीला वरवट बकाल ता.संग्रामपूर येथील बस स्टॅड वरवट बकाल जवळील युवराज ज्वेलर्स,प्रथमेश ज्वेलर्स आणि रेणुका ज्वेलर्स या तीन दुकानावर काही अज्ञात चोरट्यांनी या तीन दुकानाचे लोखंडी शटर वाकवुन व कटरच्या सहायाने पटटया कापुन दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचा प्रकार दिनांक 25 जून च्या सकाळी उघडकीस आला आहे त्यामध्ये रेणुका ज्वेलर्स मधुन एक इलेक्ट्रिक वजन काटा अंदाजे किंमत 7000 रु.व चांदीचे तीन फोटो फ्रेम किंमत 3500 रु प्रथमेश ज्वेलर्स मधुन नगदी 2000 रु .व पर्समधील एक ग्रॅम सोन्याचे मनी किं.अ .5000-रु . युवराज ज्वेलर्समधुन एक हातातील ब्रासलेट तसेच दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या चांदीच्या तोरडया किंमत.5000रु
असा एकूण 22500 रु.चा मुद्देमाल माल लंपास झालेला आहे हकीकत अशी आहे की यातील दुकान मालक यांचे सोन्याचांदीचे दुकान असुन ते नेहमीप्रमाणे दि 24/06/2022 रोजी रात्री 08/00 वा दरम्यान दुकान बंद करून घरी गेले नंतर दि . 25/06/2022 रोजी सकाळी वरवट येथिल नंदु टाकळकार यानी एका दुकान मालकांना दुकान चे शटर अर्धवट उघडे असल्याचे सांगीतले नंतर इतर दोन्ही दुकानाचे मालक यांनी सुध्दा आपआपले ज्वेलर्सचे दुकान वर जावुन पाहीले असता घडलेला प्रकार निदर्शनात आला घटनेची महिती कळताच ठाणेदार उलमाले तसेच पोलीस उपनिरीक्षक विखे यांनी आपल्या सहकारी सह घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा करून पुढील शोध तपास करीत आहेत