आशाताई बच्छाव
अनधिकृत अतिक्रमण काढा,अतिक्रमण धारकांवर फौजदारी कारवाई करा.
संग्रामपुर विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे
” संग्रामपूर आणि तहसीलदार,मुख्याधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तत्काळ निलंबित करा”!!
,मागण्या करिता
14 जून2022 पासून पत्रकार राजेंद्र ससाणे यांचे बेमुदत आमरण उपोषण ,,,,,,! उपोषणाचा
पहिला दिवस,,,,
संग्रामपूर शहरातील शासकीय गट,220 सह पड,गायारान, सार्वजनिक रस्ते,मोकळी जागा,एन,ए,34/36 मधील संपूर्ण ओपन स्पेस, 214 जमिनीवर अनधिकृत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात शासनाची जमीन बळकावली आहे, अतिक्रमणामुळे शहरातील नागरिकांना येण्या जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच रात्री बेरात्री रुग्णाला उपचारकरिता नेण्यासाठी रुग्ण वाहिकेला शहरात जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही,अतिरिक्त जागेवर बेकायदेशीर रित्या केलेले अतिक्रमण तात्काळ काढून अतिक्रमण धारकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करा अस्या तक्रारी तहसीलदार मुख्याधिकारी यांचे दालनात बऱ्याच वेळा दिल्या परंतु सबंधित विभागाने आज पर्यंत कोणती ही कारवाई केली नाही, तसेच शासन निर्णय 07 सप्टेंबर 2010 मध्ये स्पष्ट पणे नमूद केले आहे की शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध,निषकाशित करणे,फिर्याद दाखल करणे,असे असताना संबंधित अधिकारी एकमेकावर आपली जबाबदारी ढकलत आहेत शासन निर्णय याला तहसीलदार व मुख्याधिकारी यांचे कडून केराची टोपली दाखवली जातआहे त्यामुळे संबंधित दोषी अधिकारी यांचेवर तत्काळ निलंबनाची,कारवाई करावी कारवाई न झाल्यास येत्या 14/6/2022,रोजी संग्रामपूर एस टी स्टँड वरील मोकळ्या जागेवर आमरण उपोषण करण्यात येईल असे दिनाक 18/5/2022 रोजी दिलेल्या तक्रारीत नमूदआहे व उपोषण काळात उद्भवलेल्या परिणामास आपण जबाबदार असा इशारा राजेंद्र ससाने यांनी निवेदनातून दिला होता,परंतु शासनाने व प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, अखेर लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई,पालक मंत्री बुलडाणा,आमदार संजय कुटे जामोद,उप,विभागीय अधिकारी ज,जा,तहसीलदार संग्रामपूर,मुख्याधिकारी नगर पंचायत संग्रामपूर, ठाणेदार पोलिस स्टेशन संग्रामपूर,ऍड,सतीशचंद्र rothe,शेख सईद संग्रामपूर तालुका पत्रकार संघ,यांना पाठविले आहे.