Home मुंबई मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0054.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: काल कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले मोठे निर्णय! मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आज कॅबिनेट मीटिंग पार पडली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत देणार असे शिंदे सरकारने सांगितले. दोन हेक्टरी मदत वाढवून तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत १३६०० रुपये मिळणार आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाला १० हजार कोटी वाढीव निधी मिळणार आहे असे शिंदे सरकारने सांगितले. मेट्रो कारशेडचे काम वेगाने करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मेट्रो साठी केंद्र सरकार, त्याबरोबर जायका मदत देणार आहे. मेट्रोचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल असेही फडणवीस यांनी सांगितले. कुलंब्रा, वांद्रे, सीप्झ पहिला टप्पा 2023 पर्यंत. रत्नागिरी मध्ये वैद्यकीय महाविद्यालय साठी मान्यता देण्यात आली आहे. या सर्व बाबींबाबत या बैठकीत निर्णय झाला आहे.

Previous articleराष्ट्रिय महामार्गावरील शिवनी नाल्यावरील पुलाची उंची वाढवा आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleअखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here