आशाताई बच्छाव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श स्मृतिसोहळा पातुर्डा येथे साजरा संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
तालुक्यातील संत, महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरीत घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर २९ मे १९२९ रोजी आले होते. या घटनेला आजवर, ९२ वर्ष झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श सोहळा पातुर्डा ग्रामपंचायतच्या वतीने २९ मे २०२२ रोजी साजरा करण्यात आला आहे.
पातुर्डा येथील आठवडी बाजारात एक विहीर आहे या विहीरस्थळी डॉ. बाबासाहेब यांचे पदस्पर्श झाले होते. त्या ऐतिहासिक विहीर परिसरात पदस्पर्श स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरीचे लोकनियुक्त सरपंच शैलजा प्रकाशराव भोंगळ असून या कार्यक्रमात आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी श्री. राममूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाजकल्याणचे आयुक्त डॉ. अनिता राठोड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार वरणगावकर, गटविकास अधिकारी पाटील,तामगाव पोलीस स्टेशन ठाणेदार उलेमाले साहेब यांची उपस्थिती होती आहे. सकाळी ८ वाजता ऐतिहासिक विहीर परीसरात भंदत ज्ञानज्योती महास्थविर आणि भिकसुसंघ संघारामगिरी व समस्य उपासक, उपासिका संघ महाराष्ट्र यांचे हस्ते धम्मदेशना कार्यक्रम घेण्यात आला. युवा गायक प्रकाशदिप वानखडे यांचा संध्याकाळी ६ वाजता बुद्धभीम गितांचा समाजप्रबोधन कार्यक्रम पार पडला तसेच या कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते