Home बुलढाणा गावातील पाणीटंचाई करीता शासन उपाय योजना जाहीर

गावातील पाणीटंचाई करीता शासन उपाय योजना जाहीर

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220529-WA0008.jpg

गावातील पाणीटंचाई करीता शासन उपाय योजना जाहीर

 संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिल्ह्याबरोबरच तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निवारणार्थ शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्यामध्ये विंधन विहिरी, खाजगी विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, कूपनलिका व पाण्याचे टँकर आदींचा समावेश आहे ह्या करता पाणी टंचाई निवारणार्थ संग्रामपूर तालुक्यातील ४ गावासाठी विंधन विहिरी आणि २० गावांसाठी कुपनलिका असे एकूण २४ गावांसाठी विंधन विहिर व कुपनलिका मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अविकसित असणाऱ्या संग्रामपूर तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यातील आदिवासी भागातील चुनखडी,
हडियामल,शिवाजी नगर, चिचारी ह्या ४ गावासाठी विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या असून नवे भोन, आलेवाडी, सायखेड, लाडनापूर, शिवणी, कवठळ, हिंगणा कुंभारखेड, बावनबीर, एकलारा कोलद, जस्तगाव, आवार, पळशी (झांशी) करमोडा, वकाना, वडगाव वाण, वानखेड काटेल, रुधना ह्या २० गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गावांमधील पाणी टंचाई सोडण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आणि संग्रामपूर चे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली.

Previous articleराजगड” ची तंटबंदी आमदार संग्राम थोपटे यांनी कायम राखली कारखान्याच्या सर्व जागांवर काँग्रेस विजयी!
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श स्मृतिसोहळा पातुर्डा येथे साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here