राजेंद्र पाटील राऊत
ताहाराबाद महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात संपन्न
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
ताहाराबाद येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. एल. साळी यांच्या शुभहस्ते वसुंधरेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम. एल.साळी सर होते. यावेळी ते म्हणाले की, आज जागतिक वसुंधरा दिन जगभर साजरा केला जातो आहे. भारताच्या संदर्भात विचार केला तर असे लक्षात येते, येथील संस्कृतीतील प्रत्येक सणांमध्ये वसुंधरेच्या अंतर्गत असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या घटकाचे पूजन भारतीय नागरीक करत आला आहे. अलीकडे बदललेल्या वातावरणाला मनुष्यच कारणीभूत आहे. मनुष्याने निसर्गाचे नियम समजून वागले तरच त्याला भविष्यात चांगली जीवन जगता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रेय फलके म्हणाले की, आज जागतिक तापमान वाढीचे संकट सर्वांसमोर उभा आहे. याला कारणीभूत पृथ्वीवर भांडवलशाहीच्या माध्यमातून आलेले औद्योगीकरण, शेतीत केले जाणारे रासायनिक प्रयोग यामुळे वातावरणातील ओझोन वायूच्या स्तराला पोहोचलेल्या धोका हा मनुष्य जीवन एक दिवस धोक्यात आणणारा आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहून वसुंधरेचे रक्षण करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून व सुंधरेबद्दलची आपली अभिव्यक्ती व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक उमेश पाटोळे यांनी केले .सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक शिवदे यांनी केले. आभार प्राध्यापक लक्ष्मण सूर्यवंशी यांनी मांनले.यावेळी कार्यक्रमास उपप्राचार्य डी.डी.बच्छाव, NACC सदस्य प्राध्यापक डी.के. निकम शिक्षक शिक्षकेतर सेवक व बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.