राजेंद्र पाटील राऊत
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवि मराठा न्युज नेटवर्क)– कळवणचे तहसीलदार साहेब बि ए कापसे यांना निवेदन देताना सुळे (जयदर)गावातील ग्रामस्थ कृष्णा गवळी,कांतीलाल गांगुडॅ,धोंडीराम गांगुडॅ,जीवा गांगुडॅ,प्रविण गांगुडॅ,किरण बागुल,समाधान गांगुडॅ,राहुल बागुल व ताराचंदृ गावित आदि गामस्थानी कळवणचे तहसीलदार साहेब बि ए कापसे यांना निवेदन देऊन सांगीतले की सदर आमच्या गावातील रेषन दुकानदार पोपट बागुल हे अंत्योदय काडॅ धारकाला 35किलो धान्य मिळते परंतु रेषन दुकानदार फक्त 15किलो धान्य देतो व पृतेक काडॅ धारकाला 5किलो धान्य कमी देतो व अंत्योदय काडॅ धारकाला साखर सुद्धा मिळत नाही. सदरील रेषन दुकानदार यांना विचारले असता की आम्हाला वरूनच कमी रेषन वाटप होते म्हणून आम्ही कमी देतो. तुम्हाला काय करायचे ते करा पण मी कोणालाही घाबरत नाही. तहसीलदार कडे जा अगर पुरवठा अधिकारी जा तरी मी कोणालाही घाबरत नाही. सदर रेषन दुकानदार हे आम्हाला पावती सुद्धा देत नाही तरी तहसीलदार साहेबांना आमची एकच विनंती आहे की सुळे गावातील रेषन दुकानदार पोपट बागुल याच्यावर तात्काळ कायॅवाही व्हावी व चौकशी करावी अशी विनंती सुळे गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.