Home मराठवाडा जाहीर निषेध! जाहिर निषेध! जाहीर निषेध! जालना तालुक्यात समाजकंटकांकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत...

जाहीर निषेध! जाहिर निषेध! जाहीर निषेध! जालना तालुक्यात समाजकंटकांकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाची विटंबना..

432
0

राजेंद्र पाटील राऊत

जाहीर निषेध! जाहिर निषेध! जाहीर निषेध!
जालना तालुक्यात समाजकंटकांकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाची विटंबना..

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

जालना जिल्हात पिरपिंपळगाव या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने/ समाजकंटकांकडूनमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाची विटंबनाकरण्यात आलेली आहे.
महाविकास आघाडीच्या बोगस कारभारामुळे महाराष्ट्रातीलआराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाची विटंबना होण्याचे प्रकार वाढत आहेत. ठाकरे सरकार आपल्या निदर्शनात आणून देतो की, गेल्या महिन्यात १८.१०.२०२१ रोजी हिंगोली जिल्ह्यात आमदार श्री राजू नवघरे यांनी सार्वजनिक कार्यक्रम मध्ये तमाम महाराष्ट्रातील शिवभक्त,शिवसैनिक,यांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.

त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अश्र्वावर चडून पुष्पहार अर्पण केला होता. त्या संधर्भात युवा मराठा वेब न्युज चॅनल ने ऑनलाईन पोर्टल वर बातमी दिली होती आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघा कडून मुख्यमंत्री, उपमुखमंत्री यांना निवेदन दी.१८.१०.२०२१ रोजी दिले होते त्यावर अजून काही कारवाई करण्यात आली नाही.

ठाकरे सरकार ने ‘ त्या ‘ राजू नवघरे आमदारांना तात्काळ निलंबित केले असते तर हे असे प्रकार परत झाले नसते,आता ह्या घटनेला कारवाई न केल्यामुळे ठाकरे सरकार, महाविकास आघाडी सरकार कोण कारवाई करणार,की अजूनही फक्त निवडणुका आणि राजकारण करण्यासाठी आपला पक्ष वाढविण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा नावचा वापर सगळे राजकीय पक्ष अजून किती दिवस करणार आहात?

तुमचे नेते, कार्यकर्ते, भर सभेत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार तुमि निलंबन कारवाई करणे बाजूला राहिले प्रतिक्रिया ही देऊ शकत नाही?

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ पुन्हा एकदा या निमित्ताने मुख्यमंत्री,विधान मंडळ अध्यख यांना विनंती करतो की,आता तरी राजकारण सोडून या गोष्टी कडे लक्ष्य द्या ,आमदार राजू नवघरे अजूनही निलंबित कीव कारवाई झाली नाही. तात्काळ राजू नवघरे यांचे निलंबन आणि जालना जिल्हा मध्ये जो आज प्रकार घडला त्याचे सखोल चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा करावी, व्यक्ती जाती अज्ञात असला तरी महाराष्ट्रातले पोलिस खाते नंबर १ चे खाते आहे, आर्यन खान ला पोलिस खाते राजकारणी लोक पोलिस कोठडीत ठेऊ शकतात पुरावे त्याची सगळी कुंडली तयार करू शकतात तर एक अज्ञात व्यक्तीचा पोलिस खाते तपास लावू शकत नाही का…?

आम्ही युवा मराठा पत्रकार महासंघच्या वतीने हे कार्य करणाऱ्या त्या समाजकंटकाचा आणि राजू नवघरे यांना राजकीय पाठींबा देऊन कारवाई न करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here