Home Breaking News प्रमोद पाटील यांना आर सी एफ चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार

प्रमोद पाटील यांना आर सी एफ चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार

114
0

 

 

कोल्हापूर : तळसंदे ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रमोद यशवंतराव पाटील यांना राष्ट्रीय केमिकल्स व फर्टीलायझर चा प्रगतशील शेतकरी पुरस्कार मिळाला .आर सी एफ चे क्षेत्रीय प्रभारी वेंगुर्लेकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण झाले.
स्वागत व प्रास्ताविक संदीप सोकाशी यांनी केले भारत सरकारच्या अधिपत्याखालील आरसीएफ च्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातून दोन शेतकरी व दोन डीलर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये प्रमोद पाटील तळसंदे व अनुजा कडव भाटीवडे ता भुदरगड. डीलर मधून गणेश फर्टिलायझर्स दहिवडी सातारा  (राजेंद्र जगदाळे )वाळवा तालुका शेतकरी सहकारी भाजीपाला संघ इस्लामपूर  (पृथ्वीराज पाटील) यांची निवड झाली त्यांचा विशेष कार्यक्रमात स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन पुरस्काराचे वितरण व गौरव करण्यात आला.
यावेळी झालेल्या भाषणात क्षेत्रीय प्रभारी योगेश वेंगुर्लेकर यांनी हर्षद आरसीएफ ही भारत सरकारची कंपनी असून नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असते शेतकऱ्यांनी कंपनीच्या नवीन उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले प्रगतशील शेतकरी प्रमोद पाटील यांनी आरसीएफ चेअधिकारी, भादोले येथील श्री दत्त ॲग्रो चे सचिन पाटील व माजी पोलीस पाटील हौसेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खतांचा वापर करून ऊस व भाजीपाला यांचे भरघोस उत्पादन घेतल्याचे सांगितले. यावेळी आर सी एफ चे अमित संकपाळ जी   डी पुकळे व कर्मचारी शेतकरी उपस्थित होते .आभार सोमदेव पुजारी यांनी मानले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleराजेंद्र हायस्कूलमध्ये हुतात्मा दिन उत्साहाने साजरा
Next articleहायमास्टच्या प्रकाशाने अंबप गाव उजळणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here