आशाताई बच्छाव
वीज दरवाढ मागे घेण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- राज्यात १ एप्रिल पासून नवीन वीज दरवाढ लागू करण्यासाठी महावितरण कंपनी ला शासनाने परवानगी दिल्याने सर्व सामान्य जनतेला विज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने महावितरण कंपनीने केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्याचे आदेश करावेत यासाठी चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेच्या वतीने दि ८ रोजी निवेदनाद्वारे केली आहे,मागणी ची दखल घेतली नाही तर कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज ग्राहकांसह रयतसेना तीव्र आंदोलन छेडनार असल्याचा इशारा देण्यात आला आहे,
राज्यात १ एप्रिल पासून नवीन वीज दरवाढ लागू झाल्यास महावितरण कंपनी मार्फत वीज ग्राहकांना स्थिर आकार वाढविण्यात येणार आहे त्यातच इंधन अधिभार जोडल्यावर १० टक्के दरवाढ होणार आहे, घरगुती संवर्गातील सिंगल फेजसाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे आता एक एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागणार आहेत. वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार दरवाढ लागू केल्यास सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडणारी नाही म्हणून शासनाने महावितरण कंपनीने केलेली विज दरवाढ त्वरित मागे घेण्यास आदेश करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, ९ वर्षापासून दिल्ली मध्ये “केजरीवाल सरकारकडून” २००, युनिट प्रति महिना सर्व कुटुंबांना मोफत वीज दिली जाते. अणि गेल्या २, वर्षापासून पंजाब मध्ये भगवंत मान सरकार कडून ३००, युनिट पंजाब मधील प्रत्येक कुटुंबाला मोफत वीज दिली जाते. तरीही तेथील वीज कंपनी व राज्याचे बजेट फायद्यात आहे. महाराष्ट्रा मध्ये वीज कंपनी कडून सर्वात महाग वीज महाराष्ट्रातील जनतेला दिली जाते. अणि आता त्यामध्ये दि १ एप्रिल पासुन १०,% दरवाढ केली जात आहे, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस,पवार सरकार नक्की जनतेसाठी काम करीत आहे की महावितरण कंपनी चे भले करण्यासाठी काम करत आहेत असा प्रश्न जनतेमध्ये आहे. जनतेमधून निवडून यायचे आणि जनतेलाच वेठीस धरून आर्थिक भुरदंड लादायचा हे अन्याय कराक आहे . सरकार सर्व सामान्याचे नसून व्यापारी धार्जिणे असल्यामुळे जनता सर्व बाजूने त्रस्त झाली आहे, त्यात केलेली वीज दरवाढ परवडणारी नसल्याने राज्य सरकारने दरवाढ मागे द्यावी अन्यथा
वीज ग्राहक व रयत सेना चाळीसगाव महावितरण कंपनी कार्यालयासमोर येत्या ८ दिवसात तीव्र आंदोलन छेडेल यास सर्वस्वी महावितरण कंपनी व चाळीसगाव कार्यकारी अभियंता जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे,निवेदनाच्या प्रत ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री जळगाव, आमदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत,
निवेदनावर प्रदेश सहसंघटक ज्ञानेश्वर कोल्हे ,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे ,स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष भरत नवले ,शहरअध्यक्ष छोटू अहिरे ,शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर सहसंघटक दीपक देशमुख ,शहर उपाध्यक्ष सतीश पवार, मार्गदर्शक राजेंद्र पाटील, शहर संघटक शिवाजी गवळी, उमेश पवार , प्रा चंद्रकांत ठाकरे,शेतकरी दिलीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.