Home बुलढाणा वानखेड ते वरवट बकाल रोडच्या कामावर बांधकाम विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.?

वानखेड ते वरवट बकाल रोडच्या कामावर बांधकाम विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.?

167
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_212510.jpg

वानखेड ते वरवट बकाल रोडच्या कामावर बांधकाम विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.?

युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील – ग्रामा 97 वानखेड ते वरवट बकाल रस्त्याची सुधारणा करणे चालू असलेल्या कामावर वान नदीपात्रातून अवैधरित्या रेती मिक्स रुडी वापरण्यात आली त्यामुळे ररत्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे मात्र सदर काम सुरू असताना नदीपात्रामधून अवैद्य उत्खनन करून रेतीमिक्स रूढी वापरल्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याला टक्केवारीचे ग्रहण लागलेले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याच्या कामाकडे वानखेड गावातील नेत्यांचे देखील दुर्लक्ष झाले असून जनतेच्या पैशातून अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे रस्ते होत असतांना गाव पुढारी जर गप्प बसत असतील तर यासारखी वाईट शोकांतिका कोणतीच नाही शासन कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामावर खर्च करीत असतांना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही टिकतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे सदरच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे निकृष्ट दर्जाचे काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी हे शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत या रस्त्याच्या कामाची चौकशी होणे तर आवश्यक आहेच त्याचबरोबर या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणे त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असल्याचे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

Previous article_विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.._
Next articleशोक संदेश युवा मराठा न्यूजचे सुनील गांगुर्डे यांना मातृशोक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here