आशाताई बच्छाव
पिंगळवाडे परिसरात संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
साधारण चार दिवसापासून सुरू असलेली पावसाची जबरदस्त हजेरी यामुळे सर्वसामान्य व्यक्तींचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या पावसामुळे पेरणी झालेली पीके कुज होताना दिसत आहे. त्यात मका, बाजरी, सोयाबीन, तूर,इत्यादी पिके पूर्ण वाया जातील की काय अशी शंका शेतकरी वर्गाला दिसत आहे. या बरोबरच ज्या डाळिंब बागा काही दिवसातच काढणीवर येणार होत्या अशा बागा पूर्णपणे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. डोंगर दऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे डोंगरकाठी असलेल्या शेत जमिनीत पाणी घुसल्याने जमिनीची भुस्खकलन होत आहे. तसे या पाण्यामुळे बहुतेक रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत.पांधण रस्त्यांची तर अवस्था अगदी बिकट आहे. शेतमजूर, शेतकरी वर्ग चार दिवसापासून घरातच बसून असल्यामुळे शेतातील कामे खोळंबंली आहेत. या पावसामुळे पाळीव प्राण्यांचा चार्याअभावी दुरावस्था झाली आहे. भाजीपाला पिके आता मात्र पूर्णपणे वाया गेली आहे. त्यात कोबी, वाल, टोमॅटो ई. पावसामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा त्रास होताना दिसत आहे. जवळ जवळ 70 टक्के विद्यार्थी घरीच आहेत. बहुतांशी विद्यार्थी शेतात राहत असल्यामुळे पांदण रस्ते वाहून गेल्याने विद्यार्थी वर्गाने घरीच राहणे योग्य समजले आहे. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे