आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि: २२ मार्च जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई होण्याची गंभीर शक्यता असल्याने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ/मुंडे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आले. जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील वर्षाच्या पेरणी अहवालानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी १८६४५८.७७ मे टन चारा शिल्लक असून तो अंदाजे ४३ दिवस पुरेल चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासू शकते. जिल्ह्यातून उपलब्ध होणारा सर्व प्रकारचा चारा याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणणे जिल्ह्याबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये. जेणेकरून बीड जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ/मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार बीड जिल्ह्यात उत्पादित होणारा किंवा सद्यस्थितीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा बीड जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास पुढील आदेश येईपर्यंत मनाई करण्यात आली आहे.