आशाताई बच्छाव
चांदूरबाजार,(मयुर खापरे ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे भेटुन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत व विविध समस्याबाबत निवेदन भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजाननराव काळमेघ यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या विविध मांगण्या घेऊन भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजाननराव काळमेघ यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे भेटुन सक्तीची कर्जवसुली बंद करुन शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी व शेतीसाठी पूर्णवेळ व पुर्णदाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, मागील वर्षीचा प्रलंबित दुष्काळ निधी व यावर्षीचा दुष्काळ निधी शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावा ,वन्यप्राण्याकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळन्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात किवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी व पिकविम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणुक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी.
महत्वाचे म्हणजे २००८ पूर्वीचे ५ एकराच्या वरील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत व तसेच २०१४ व २०१९ मध्ये सुद्धा वंचीत राहलेल्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्ज माफी मिळण्यात यावी व ह्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या निकाली काढुन शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना गजाननराव काळमेघ यांनी केली.