आशाताई बच्छाव
आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/गेवराई दि:११ मराठा समाजाला मुंबईत आरक्षणाची घोषणा झाली मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे. तोच आरक्षणाच्या अंमलबजावणीला उशीर होत असल्याने एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे घडली. गेवराई तालुक्यातील नागझरी येथील हनुमान शिवाजी शिंदे वय २७ वर्षे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली. मराठा आरक्षणाला उशीर होत असल्याने हनुमानने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. हनुमान शिंदे यांनी आयटीआय केला होता, मात्र तो बेरोजगार होता. आरक्षण मिळाल्यास रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा त्याला होती. हनुमान शिंदे हा आरक्षणाच्या आंदोलनात सातत्याने सहभागी असायचा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला गेलेल्या आरक्षण रॅलीत शिंदे याने सहभाग नोंदवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल अशी अपेक्षा होती. मात्र आरक्षणाची घोषणा होऊनही अंमलबजावणीला उशीर होत असल्याने हनुमान शिंदे यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे कुटुंबीयाची परिस्थिती हालाखीची आहे. शिंदे यांच्या पश्चात आई बहीण असे कुटुंब आहे. या घटनेत गेवराई आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.