आशाताई बच्छाव
अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :- वंचित बहुजन आघाडी
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) जिल्हयातील बहुतांश शेतकरी धानाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेत असून शेतकरी कुटूंबाची उपजिविका धानाच्या शेतीवर अवलंबुन आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुरुवातीपासून धानावर खोड किडा, बुरशीजन्य रोग आणि विषाणूजन्य रोगामुळे नुकसान झाले, त्या परिस्थितीला सारुन शेतकरी धान कापणी, धान मळणी करीत असतांना अचानक ढगाळ वातावरणानंतर जिल्हयात २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दानादाण झाली. कापणी केलेले धान पिक पाण्यात सापडले. त्याच प्रमाणे बांध्यात पाणी साचलेले असल्यामुळे धानाची कापणी करता येत नाही, मळणीचे काम लांबणीवर गेले. यामुळे धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली, पाण्यात सापडलेल्या धानाला अंकुर फुटल्यासारखे झाले, हे सदृश्य संकट शेतकऱ्यांवर आलेले आहे.
त्यामुळे अवकाळी आलेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडारा च्या वतीने करण्यात येत आहे, अंकित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आली आहे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, जिल्हा संघटक डी जी रंगारी, माजी सभापती व सल्लागार चरणदास मेश्राम,मार्गदर्शक तुळशीराम गेडाम, मनोज खोब्रागडे, ताराचंद नंदागवळी, तोताराम मेश्राम, ग्यांनचंद जांभूळकर, सदानंद रंगारी, मेघराज अंबादे, सी डी गवरे, नितीन गजभिये, अनिल मेश्राम, आर के रामटेके अमित नागदेवे, महिला जिल्हाअढेक्स तनुजा नागदेवे, व संविधान बचाव संघर्ष समिती चे रोशन जांभूळकर, अचल मेश्राम, ग्यानचंद जांभूळकर कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी पाठिंबा दिला कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.