आशाताई बच्छाव
पत्रकारांच्या पिढीचा मार्ग मोकळा: IIMC सोबत विद्यापीठचाMOU श्रमिक पत्रकार संघाने लावून धरला होता मुद्दा, सिनेटर गिरीश शेरेकर यांचाही पुढाकार.
———-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती. मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून अंधा तरी राहिलेला पत्रकारांच्या पदव्युत्तर आचार्य पदवीचा (पीएचडी) मुद्दा सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. अमरावती श्रमिक पत्रकार संघ आणि सिनेट सदस्य असलेल्या याच पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने हा मुद्दा लागला असून विद्यापीठ (आय आय एम सी) सोबत सामंजस करा (एम ओयु) करून मार्गदर्शक उपलब्ध करून दिले आहेत
सिनेट बैठकीत शेरेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना पिठाची सभापती तथा विद्यापीठचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी वरील माहिती पुरवली. केंद्रीय नमो आणि मंत्रालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे (आय आय एम सी) एक केंद्र अमरावती विद्यापीठ च्या परिसरात आहे. महाराष्ट्रातील या एकमेव केंद्रात असलेले तीन प्राध्यापक मार्गदर्शकांचा पात्रता पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचे सहाय्य घेऊन अमरावती विद्यापीठ ची’-एम -पेट”ही पीएचडीची प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांना पीएचडीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पत्रकारितेच्या पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या पत्रकारासाठी गेल्या अनेक वर्षापासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तर्फे’एम-पेट’परीक्षेचे आयोजन केले जाते. मुळात ही परीक्षा अत्यंत कठीण पातळीचे असते. त्यामुळे त्या परीक्षेचा निकालही १०ते१५ टक्केच्या पुढे जात नाही. परंतु अशी कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही त्यांना पुढचा मार्ग उपलब्ध नव्हता. पीएचडी केवळ प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली, एवढाच काय तो आनंद त्यांना मिळायचा, मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने ना संशोधन केले जात होते ना संशोधन पीएचडीसाठीचा प्रबंध तयार करण्याची त्यांना संधी मिळत होती. ही बाब प्रकाशाने पुढे करून अमरावती श्रमिक पत्रकार संघाने कुलगुरू डॉ प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डा. तुषार देशमुख, वेगवेगळ्या विषयाचे अधिष्ठात तसेच डॉ. वैशाली गुडधे,प्रा. रवींद्र कडू, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, प्राचार्य डॉ. आर डी सेकची, विद्यापीठ च्या अधिकारी साक्षी ठाकूर, सिनेट सदसप्रा. कैलास चव्हाण, मोहरी जंजाळ आधी सोबत पत्र विहार करून या मुद्द्याकडे त्यांचे लक्ष वेधले होते. गेल्या सहा महिन्यापासून हा पत्रकार सुरू होता. दरम्यान या सर्वांनी देखील या विषयात तेवढ्याच अनुमतीने लक्ष पुरवून वेगवेगळ्या प्राधिकरणीमध्ये हा मुद्दा लावून धरला. शेवटी कायदेशीर आयोध्याचा आधार घेत विद्यापीठ आय आय एम सी सोबत संबंध करार करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची कारवाई पूर्णत्वास जाण्याचा.