आशाताई बच्छाव
पंकजा महाराष्ट्र भरलेल्या म्हणून कारवाई: बच्चू कडू यांची मुंडे वरील जीएसटी विभागाच्या कारवाईवरून भाजपवर निशाणा; राजकारण तापले.
—————————_– दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती संवाद यात्रा काढली. या यात्रेतर्गंत त्या महाराष्ट्रभर फिरल्या त्यामुळे त्यांच्या कारवाई झाली असेल असा सूचक शब्दात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुंडेवर झालेल्या जीएसटीच्या कारवाईच्या भाष्य केले आहे. याद्वारे त्यांनी एक प्रकारे भाजपवर शर संधान साध्य आहे. एसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्य वैद्यनाथ सहकार साखर कारखाने कार्यवाही केली. या अंतर्गत कारखान्याची जवळपास १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात असताना बच्चू कडू यांनी उपरोक्त विधान केले आहे. बच्चू कडू यांनी अमरावती पत्रकाराचे संवाद साधताना म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती संवाद यात्रा काढली. या यात्रेर्गत त्या स्वतः महाराष्ट्रभर फिरल्या यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. असेल असे वाटते परंतु पंकजा मुंडे वर काय कारवाई झाली? असा प्रश्न उपस्थित केला. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्र सरकारचा जीएसटी टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात या कारखान्यावर छापीमारी केली होती. त्यावेळी या कारखान्याने तब्बल १९ कोटी रुपयाचा जीएसटी बुडाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी जीएसटी विभागाने शनिवारी कारखान्याला नोटीस पाठवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी केंद्रीय जीएसटी आयुक्त कारखान्याची तब्बल १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.