आशाताई बच्छाव
संत रविदास चर्मउद्योग आर्थिक विकास महामंडळाच्या अटी रद्द कराव्या
चर्मकार समाजाची जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी
जालना (प्रतिनिधी) ः संत रविदास चर्मउद्योग आर्थिक विकास एन. एस. एफ. डी. सी. चे कर्ज प्रकरणाचे सर्व अटी रद्द करून पाच लाख रुपये पर्यंतचे कर्जाला जामीनदारची अट रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय गुरू रविदास परिवर्तन सेनेचे अध्यक्ष देविलाल बिरसोने यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत रोहिदास चर्मउद्योग आर्थिक विकास महामंडळ एन एस एफ डी सी चे पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्जाची जामीनदार अटी रद्द करण्यात यावी तसेच 25 लाख रुपये पर्यंत कर्ज वाटप एन एस एफ सी अंतर्गत सुरू करण्यात यावे. तसेच संत रोहिदास चर्मउद्योग आर्थिक विकास महामंडळाचे अनुदान एक लाखापर्यंत करण्यात यावे. सामाजिक न्याय विभाग मार्फत देण्यात येणारी स्टॉलची व्याप्ती वाढून त्यांच्यासोबत पंचवीस हजार रुपये अनुदान सुरू करावे. जालना जिल्ह्यासह शहरामध्ये चर्मकार समाजासाठी खासदार निधीतून संत रविदास सभागृह बांधण्यात यावे. सदरील मागण्या मान्य न झाल्यास चर्मकार समाज बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर देवीलाल बिरसोने, संजय बनस्वाल, संतोष तूपसौंदर, अनिल भगुरे, विष्णू जिगे, राम खैरे, रवी कदम, सुरेश सदगुरे, शरद सुटे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.