आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय
देगाव वासीयांना या रस्त्यामुळे भोगावे लागतात नरक यातना
मुक्रमाबाद प्रतिनिधी बसवराज वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद ते देगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे दिसुन येत आहे. गेल्या अनेक वर्षापासुन परतपुर फाटा ते देगाव खतगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याच रस्त्यावर परतपुर फाट्याजवळच एका ठिकाणी पुलाला भगदाड पडले असून पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकुन प्रवास करणे असाच प्रकार असल्याचे दिसते. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी खड्डे पडून पाणी जमल्यामुळे खड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही. यामुळे दुचाकी वाहन धारक गाडी घसरुन पडत आहेत.
संबंधित विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या ग्रामीण भागाच्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे अशी चर्चा प्रवाशातुन होताना दिसुन येत आहे.
ग्रामीण भाग शहराशी
जोडला जावा म्हणून विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. दळणवळण व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात राबविण्यात येतात माञ दर्जाहीन कामे करून शासनाला चुना लावला जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या पावसाळा असल्याने
पाण्याने रस्त्यावर दोन-तीन फुटांचे खड्डे पडले आहेत. शाळकरी विद्यार्थी व शिक्षक ,प्रवाशांना या खड्ड्यातुन मार्ग शोधावे लागत आहे. विद्यार्थ्यांना, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग या रस्त्याकडे विशेष महत्व देत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.यामुळे या रस्त्याला विद्रुपीकरणाचे स्वरुप आले आहे.
या रस्त्या संदर्भात अनेक वेळा मागण्या करून देखील संबंधित विभाग याकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता जास्त नाकारता येत नाही. जीवित हानी झाल्यावरच प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न पडल्या वाचुन राहत नाही.संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तातडीने हा रस्ता बनवण्यात यावा अशी मागणी देगाव येथील नागनाथ रेड्डी यांनी केली आहे.