आशाताई बच्छाव
श्री संजय वाघमारे पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी: समृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला भीषण अपघात; महाराष्ट्रातील बुलढाणा या ठिकाणातील बस नागपूर वरून पुण्याला निघाली असताना, या बसला समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात घडला. ही बस नागपूरहून पुण्याला जात असताना हा अपघात घडला. 30 जून रोजी ही बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. हा अपघात समृद्धी महामार्गावर मध्यरात्री १:२२ मिनिटांनी घडला असे प्राथमिक अंदाज सांगितला जात आहे. या खाजगी बस मध्ये नागपूरचे १०, यवतमाळचे ३ व वर्धा तील १४ असे प्रवासी एकूण ३३ प्रवासी होते.या ३३ पैकी २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असे सूत्राने सांगितले. त्यापैकी ८ प्रवासी सुखरूप आहेत. राहिलेल्या प्रवाशांवरती बुलढाण्यातील सिविल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हि बस नागपूरहून निघाली असताना वर्ध्यात संध्याकाळी ७:३०ला प्रवासी बस मध्ये बसले. संध्याकाळी ८ वाजता ही बस यवतमाळला पोहोचली. अशाप्रकारे या बसचा प्रवास होत असताना हा दुर्देवी अपघात घडला. या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मुख्यमंत्र्यांनी ५ लाखाची मदत घोषित केले आहे. तर पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखाची मदत जाहीर केली.त्या ठिकाणी अमरावतीतील पोलीस निरीक्षक जयंत नाईक ही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताचे सविस्तर माहिती देण्यास सांगितले. एकूणच काय तर समृद्धी महामार्ग हा एक प्रकारे अपघाताचे जाळे झाले असे म्हणण्यात हरकत नाही. तेथील नागरिकांनी सांगितले आहे की समृद्धी महामार्गावरती नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हा अपघात होत आहे. शासनाने या महामार्गावरती खूप कडक नियम करावेत असे त्यांनी या ठिकाणी विनंती केली.