Home नाशिक भगुर चा उड्डाणपूल उजेडाच्या प्रतिक्षेत

भगुर चा उड्डाणपूल उजेडाच्या प्रतिक्षेत

168
0

आशाताई बच्छाव

IMG-20230704-WA0046.jpg

भगुर चा उड्डाणपूल उजेडाच्या प्रतिक्षेत
सुदर्शन बर्वे (भगुर प्रतिनिधी)
:- भगूर शहर येथे नुतन विद्या मंदिर, रेल्वे गेट नंबर ८५ वर भगूर ते विजयनगर, राहूरी, पाढुर्ली , विंचुरी अशा अनेक खेडे पाडे जोडनारा उड्डाणपुल स्थानिक खासदार निधीतून बांधन्यात आला परंतू या वर पथदिप नसल्याने आजही रात्रीच्या वेळेस उजेडाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचे झाले असे की गेले तीन वर्षापासुन बांधून पूर्ण झाला व तो नागरिकांना ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला पण रात्रीच्या वेळी या पुलावर अजून ही पथदिप ( स्टीट लाईट) नसल्याने यावरून ये-जा करणे गैरसोयीचे झाले असून या चा त्रास रात्रीच्या वेळी पाई प्रवास करणारा अबाल वृद्ध, महिला वर्ग तसेच नागरिकांना होत असून त्यांना भितीच्या वातावरणात पाई चालावं लागत कारण रात्रीच्या वेळेस आजची परिस्थिती पाहता महिला वर्ग, अबाल वृद्ध यांची लूटमार व महिला वर्गाला छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या साठी छावणी परिषद देवळाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील याचा पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक तसेच सिन्नर येथे केला असून ,स्वराज पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना देखील गेल्या २-३महिन्या पासून याचा निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे पण बांधकाम विभाग मात्र या कडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. बांधकाम विभागाकडे या बाबत विचारले असता निधी अभावी पथदिप नह
नाही असे सांगत आहे मग पुल बांधकाम वेळी शासनाने या साठी निधी मंजूर केला नाही का? असा प्रश्न भगुर तसेच पंचक्रोशीतील नागरिक विचारत आहे आणि या मुळे नागरिक आता या उड्डाणपूला ला नक्की वाली कोण या प्रतीक्षेत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन जर महिलांन सोबत काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी बांधकाम विभागाने लवकरात लवकर उड्डाणपुलावर पथदिप बसवावे ही मागणी जोर धरू लागली आहे

Previous articleजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव शिंदे यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ.
Next articleकवळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here