आशाताई बच्छाव
अमरावती जिल्हाधिकारीश्री. विजय भाकरे यांच्याकडून पाणीटंचाई गावात पाणीपुरवठा करण्याचे आदेश निर्गमित.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी. एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पाणीटंचाई उद्भवल्यास टँकर सुरू करण्याची कारवाई विना विलंबित व्हावी, यासाठी टँकरच्या मान्यतेचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी निर्गमित केला आहे. जिल्ह्यात कुठेही त्यांचा जिल्ह्यात कुठेही उद्धभवु नये म्हणून उपविभागीय व प्रशस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील टंचाई बाबत, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची ऑनलाईन बैठक घेऊन परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला. जिल्ह्यात सध्या स्थिती ४ ठिकाणी टँकर सुरू आहे. त्यात चिखलदरा तालुक्यातील आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील १ ठिकाणी टँकर सुरू आहे. वेळ घाटातील स्थिती लक्षात घेऊन तेथे पाणीटंचाई उद्भवल्यास विना विलंब टॅंकर सुरू करतात यावा यासाठी टँकरचे मान्यता अधिकारी धारणी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला व तसे आदेशही निर्गमित केले आहे. त्यानुसार मेळघाटातील दोन्ही तालुक्यात टंचाई उद्भवल्याचे लक्षात येताच धारणी येथील उपविभागीय अधिकारी स्वतःच्या अधिकारात थेट टँकर सुरू करू शकतील. त्यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविणे आधी प्रक्रियेत वेळ न जाता गतीने कार्यवाही होऊ शकेल. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत हे आदेश लागु राहतील. ” एस डी ओ. “व तहसीलदारांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घ्यावा व टंचाई निदर्शनास येतात सुरू करून आवश्यकतेनुसार चेहऱ्यावरील व पाण्याची कमतरता जाणवणार नाही ,याची काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री विजय ठाकरे यांनी दिले. दरम्यान, पाणीटंचाई निवारणासाठी खाजगी टँकरला मुदतवाढ देण्याचा आदेशही निर्गमित करण्यात आले आहे.