Home Breaking News नर्मदेत कोसळली महाराष्ट्राची बस 13 मृत्यू हाती: मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली...

नर्मदेत कोसळली महाराष्ट्राची बस 13 मृत्यू हाती: मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली 40 प्रवासी होते स्वार: मुख्यमंत्री शिंदेंनीही घेतला दुर्घटनेचा आढावा

171

आशाताई बच्छाव

IMG-20220718-WA0071.jpg

नर्मदेत कोसळली महाराष्ट्राची बस 13 मृत्यू हाती: मृतांपैकी आठ जणांची ओळख पटली 40 प्रवासी होते स्वार: मुख्यमंत्री शिंदेंनीही घेतला दुर्घटनेचा आढावा

(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ज्ञानेश्वर पाटील दांदळे

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एस टी महामंडळाची बस कोसळुन झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आतापर्यंत 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्ये प्रदेश मधील खरघोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. बचाव कार्य व्यवस्थित पार पडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाची योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

एसटी महामंडळाला केल्या सूचना

मुख्यमंत्री शिंदे यांनी या दुर्घटना संदर्भात मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

नियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या अपघाता संदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02572223180आणि 02572217193 असा आहे आज सकाळी इंदूर होऊन अमळनेर कडे निघालेली एस टी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.

Previous articleदारुबंदी शुल्क विभागाचे दुर्लक्ष;मालेगांव तालुक्यात ताडी अण्णाचा धुमाकूळ!!
Next articleवन महोत्सव अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.