आशाताई बच्छाव
दुर्गादैत्य ग्रामसेविका कु. डी.एस माहुलकर सततच्या गैरहजेरीने नागरिक त्रस्त
सीईओ साहेब ग्रामसेवका कडे लक्ष द्या, दुर्गादैत्य ग्रामपंचायतचे नागरिक हैराण आहेत.
ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा
दुर्गादैत्य :- गावात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्राम पंचायतीचे डोळे झाक
देशपातळी पासून ते गावपातळीपर्यंत स्वच्छते करिता प्रशासन प्रत्येक गावा लाखो करोडो रुपयांचा निधी वितरीत केला जातो अस, अन् तो निधी नागरिकांच्या स्वच्छतेचे दृष्टीने हे काम प्रशासनाचे असते व त्यांनी शहर व गाव स्वच्छतेवर भर देणे हे तेव्हढेच महत्वाचे असते
स्वच्छ भारत स्वच्छ शहर चा आराध्य आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कडे शासन प्रशासनाकडून करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे मात्र दुर्गादैत्य गावात तिची वाटचाल ही तेवढ्यात झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याचे असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्न ऐरणीवर आला आहे
ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते तरी संबंधीत ग्रामपंचायीकडून याकडे लक्ष केंद्रित करुन ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे, त्या प्रसंगी गावातील तरुण वर्ग यांच्या साह अनेक तरूण दिसत आहे
बाँक्स
ग्राम पंचायत कार्यालय दुर्गादैत्य ग्रामपंचायतीच्या नागरिकांना विविध कागदपत्रांची गरज भासत असते. परंतु ग्रामसेविका माहुलकर सतत ग्रामपंचायत कार्यालयातून गैरहजर असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामसेविकाची आठवडाभर वाट बघावी लागते. नागरिकांनी ग्रामसेविकांना संपर्क केला असता त्यांचा फोन देखील बंद असतो, व कदाचित फोन सुरु असलातरी देखील ते फोन घेणे टाळत आहे. काही वेळा ग्रामसेविका माहुलकर यांना विचारणा केली असता मी मिटिंगमध्ये आहे, बाहेर गावी आहे, किंवा आजारी आहे असे अनेक कारणे सांगतात. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांची कामे अडखळी आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्रामसेविका यांना कायमस्वरूपी सुट्टीवर पाठवावे व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक देऊन ग्रामपंचायत दुर्गादैत्यचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
ग्रामसेविका च्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतमध्ये नागरिकांचे काहीही काम असले तरी ग्रामसेवक साहेब आले नाही ते आल्यावर या असे कर्मचारी सांगतात. व ग्रामसेवक कधी येतील हे देखील माहित नाही, असे उत्तर देतात. यामुळे ग्रामपंचायतीत वारंवार चकरा मारण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. तरी संबंधित अधिकार्यांनी लक्ष घालून या सतत गैरहजर राहणार्या ग्रामसेविका वर कारवाई करावी.
– दत्ता ईलामे , नागरिक