आशाताई बच्छाव
मुल्हेर येथे रास क्रीडा उत्सव संपन्न.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी उद्धव महाराज यांचे समाधी स्थळ आहे. सालाबादा प्रमाणे यावर्षी सुध्दा रासक्रिडा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. या समाधी स्थळाचे आजचे मठाधिपती भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे महत्त्व असे की हा सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भारतात वृंदावन व मुल्हेर या दोनच ठिकाणी साजरा होत असतो. प्रथम उद्धव महाराज यांच्या पादुकांचे रथ मिरवणूक होते. तसेच सायंकाळी सात वाजता साधारण 101 फुटाचे गोलाकार चक्र केळीच्या पानाने व बांबूच्या साह्याने चक्र सजवले जाते व हे चक्र समाधी स्थळाच्या प्रांगणात एका लाकडी खांबावर ठेवले जाते. हे चक्र पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत गोलाकार फिरवले जाते. असे मानले जाते कि हे चक्र श्रीकृष्ण यांच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक आहे. म्हणून याला गोल फिरवले जाते. त्यानंतर संस्थांच्या देवघरापासून लहान मुले, मुली यांना गोपिकांचा वेषांतर करून देवघरापासून समाधी स्थळ अशी मिरवणूक काढली जाते व ही मिरवणूक समाधी स्थळापर्यंत आल्यावर पारंपारिक वाद्य वाजवुन आनंद होतो साजरा होत असतो. मंदिरात आल्यावर महाआरती होते त्यानंतर रात्रभर भक्तगन भजन कीर्तन साजरा करत असतात. तसेच याप्रसंगी गावातील समाजसेवकां कडून अन्नदान केले जाते. या दिवशी समाधी परिसरात यात्रेचे स्वरूप आले असते. या उत्सवाचे व समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी मूल्हेर, अंतापुर, ताहाराबाद, करंजाड,नरकुळ, जाखोड. अशा बहुतांश गावातील महिला पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. हा उत्सव रात्रीचा असल्याने भाविकांबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शना खाली जायखेडा पोलीस स्टेशन व मूल्हेर दूरक्षेत्र यांचे पोलीस कर्मचारी रात्रभर आपले कर्तव्य बजावत होती