आशाताई बच्छाव
सासरच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय महिलेचा राहत्या घरात गळफास
पती,सासु,सासरा,दिर यांच्यावर झाला गुन्हा
युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी-रविंद्र शिरस्कार ,संग्रामपूर
संग्रामपुर तालुक्यातील ग्राम. वरवट ( बकाल) येथील २५ वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार सदर विवाहितेला हुंडा कमी दिल्याने तसेच तिला शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने दिल्याने तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला असुन या प्रकरणात सदर महिलेचा पती, सासू, सासरे,देर या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविलेला आहे आला आहे. त्यामध्ये सद्या मृतक महिलेच्या पतीस अटक करण्यात आली असून सासू,सासरा,आणि देर फरार आहेत
मृतक महिलेचा भाऊ फिर्यादी राजेश प्रल्हाद धुळे रा.हिवरखेड ता.तेल्हारा यांनी ८ सप्टेंबर २०२२ रोजी तामगांव पो. स्टे.ला
लेखी तक्रार दिली आहे की माझी बहीण नामे सौ. मीना मंगेश टाकळकर वय २५ वर्षे हिला आरोपी नेहमी लग्नात हुंडा कमी दिला आहे असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत असत. या त्रासाला कंटाळुन माझ्या बहिणीने आरोपी यांच्या राहत्या घरात आत्महत्या करून
मरण पावली आहे.
यावरून अप.क्रमांक २६१ /२०२२ कलम ४९८ भादवी ३०६ नुसार पती मंगेश किसनराव टाकळकर, सासरे किसनराव टाकळकर, सासु सरुबाई किसनराव टाकळकर व दिर संदीप किसनराव टाकळकर रा वरवट बकाल ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी मृतकाचे पती मंगेश टाकळकर यास अटक करण्यात आली असून सासू, सासरा व दिर फरार असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे हे करीत आहेत. मृतक विवाहितेस दिड वर्षाचा १ मुलगा आहे. आई विना लहान बाळ पोरके झाले असल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.