आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: पुणे,मुंबई सह अवघा महाराष्ट्र भक्ती रसात चिंब! संपूर्ण देशात त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीचे आगमन हे उत्साहात पार पडत आहे.१४ विद्या, आणि ६४ कलांच्या गणपतीचे उत्साहात आगमन झाले आहे. मुंबईमध्ये लालबागचा राजा चरणी भक्तीचा महासागर लोटला आहे. सुवर्ण गणेशाचे दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविक आतुर झाले आहेत .गणेश मंडळासह ,घरोघरी गणपतीचे दिमाखात प्रतिष्ठापना झालेली आहे. महाराष्ट्रात, त्याचबरोबर कोकणात सुद्धा गणेशोत्सव शिगेला गेला आहे. राजकारणी नेत्यांच्या घरी सुद्धा गणपती विराजमान झाले आहेत .त्याचबरोबर वडाळ्यात जीएसबी गणपती सुद्धा विराजमान झालेले आहेत .पुण्यातील मानाचे पाच गणपती ही विराजमान झालेले आहेत. त्यामध्ये कसबा, तांबडीताज,गुरुजी तालीम, तुळशीबाग, केतकी वाडा या पाचही गणपतीचे मोठ्या थाटामाटात विराजमान झालेले आहेत. त्या पाचही गणपतीच्या ढोलताशांच्या गजरात बापांचा आगमन मोठ्या जल्लोषात झालेला आहे. लाखो चाकरमानी गणपती च्या चरणी विनम्र झालेले दिसत आहेत. पुण्यातील दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना पण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यपालाकडून सुद्धा गणपतीची पूजा पार पडत आहे .एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर देशांमध्ये गणपतीचा उत्साह खूप धुमधडाक्यात पाहायला मिळतोय. दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर हा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले दोन वर्षानंतर महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस आनंदात पार पडत आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतोय. दिल्लीतील महाराष्ट्र सदना मध्ये सुद्धा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. दोन वर्षानंतर सर्व सण उत्साहात पार पडत आहेत ,हे सर्व सणांचा आनंद घरोघरी त्याचबरोबर संपूर्ण जनतेने घ्यावा असं आम्हास वाटते. एकंदरीत काय तर गणपती उत्सव यावर्षी धूम धडाका साजरा होणार हे नक्की.