आशाताई बच्छाव
परळी येथील २१० मेगावॅट प्रकल्पाची चिमणी जमीनदोस्त कशामुळे करण्यात आली; ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभा करावा- अँड.मनोज संकाये
मोहन चव्हाण
प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि: २९ रोजी परळी वैजनाथ येथील २१० प्लांट याची मुदत २०२५ पर्यंत असून या प्लांटची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही चिमणी चाळीस वर्ष जुनी आहे. परळी वैजनाथ या ठिकाणी सौर ऊर्जा प्लांट बसवण्याचे बोलले जात आहे परंतु त्या ऐवजी ६६० मेगावॅटचा प्रकल्प उभा करावा यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे परंतु त्याचा अभाव दिसत आहे. असे झाल्यास याचा परिणाम थेट परळीच्या रोजगारावर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे परळीतील दोन्हीही दिगज नेत्यांनी प्रकल्पासाठी इच्छाशक्ती दाखवावी आणि प्रकल्प सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, कोराडी, भुसावळ आणि खापरखेडा येथील २१० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू आहेत विशेष म्हणजे हे प्रकल्प परळीच्या प्रकल्पाच्या नंतरचे आहेत ते अजूनही त्याच क्षमतेने सुरू आहेत मग परळीचे प्रकल्प बंद का? याला जबाबदार कोण आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. परळीमध्ये मोठे प्रकल्प नसल्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही. प्रकल्प आल्यावर युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. परळीचा धबधबा हा राज्यात कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या रूपाने तर केंद्रात खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या रूपाने आहे याचा फायदा परळीकरांना मिळवून देण्यासाठी या दोन्हीही नेत्यांनी आपले वजन वापरून नवीन प्रकल्प आणावीत त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. ६६० मेगावॅट प्रकल्प मंजूर झाल्यास रोजगाराच्या समस्या मिळतील आणि शहराला चांगले दिवस येतील त्यामुळे प्रकल्प मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली.