आशाताई बच्छाव
पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन किनाऱ्यावर संशयापद बोटी आढळल्या! रायगड जिल्ह्यात,श्रीवर्धन समुद्रालगत दोन समस्यास्पद बोटी आढळल्या. हरिहरेश्वर, भरडखोल मध्ये दोन संशयित बोटी आढळल्याने एका बोटीमध्ये हत्यारे आढळल्याची माहिती सांगितली जात आहे. त्या बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल आढळल्याची माहिती आहे तसेच 225 लाईफ करतोस मिळाले आहेत .ही बोट लंडन या ठिकाणचे आहे असे संशय आहे. या बोटीमध्ये पाण्याच्या बाटल्या, खाण्याचे सामान हेही आढळले. पोलिसांनी दोन इंडोनेशियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे.. त्या बोटीमध्ये महत्त्वाचे कागदपत्रे मिळाली त्यानुसार ती बोट ब्रिटनमध्ये रजिस्टर आहे असे समजले जाते. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. त्यांना संशय असा आहे की पूर्वी जसा समुद्रमार्ग हल्ला झाला होता. तसेच १९९३ चा बॉम्बस्फोट घडला होता त्याचप्रमाणे काही घातपात करण्याचा प्रयत्न होता का असे संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.२६/११ चे पुनरावृत्ती होती का? असाही संशय या ठिकाणी व्यक्त होत आहे .रायगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्य सरकार ची यंत्रणा एटीएस यांनी लवकरात लवकर सूत्र हाती घेऊन पुढील सखोल तपास करावा अशी त्यांना विनंती केली आहे .या बोटीवर नेपच्यून मेरीटाईम सिक्युरिटी या नावाचे स्टिकर सापडले आहे. त्याचबरोबर संगणकही सापडले आहेत असे रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. स्वातंत्र टीम नेमून तातडीने चौकशी करावी व एटीएस बरोबर केंद्रीय यंत्रनाही याच्याबरोबर सहभागी होऊन उपाययोजना कराव्यात असे यांना वाटते. त्या बोटी मधून वामन नागरिकांना रेस्क्यू केला होता परंतु खूप मोठ्या लाटा असल्याने ती बोट वाहत वाहत आपल्या किनाऱ्यावर आली असे संशय होत आहे. केंद्रीय यंत्रणा तसेच महाराष्ट्रातील एटीएस यंत्रणा या दोन्हीही या संशयापद बोटीसाठी पुढील तपास करत आहेत त्याला त्याने सुरुवात केली आहे.