आशाताई बच्छाव
चिपळूणातील ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मृत माशांचा खच रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मंगळवारी शेकडो मृत माशांचा खच पडला होता. पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत होते. संपूर्ण तलाव परिसरात दुर्गंधी पसरली होती. तलावातील पाण्याचा रंगही हिरवट रंग आला असून पाण्यावर तेलकट स्वरूपाचा तवंग दिसून येत होता.
या तलावातील पाणी दूषित झाल्यानेच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात असून नगर परिषदेने तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत.