आशाताई बच्छाव
मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे 8 दिवसात न भरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार रास्ता रोको रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चिपळूण तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असुन मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम होणे हे जितके गरजेचे आहे त्या पेक्षाही तात्पुरत्या स्वरूपाची पावसाळ्या पुर्वी नागरिकांची सोय देखील करणे गरजेचे होते.उन्हाळ्यामध्ये खड्डे भरले गेले आणि ते पहिल्या पावसाळ्यातच व्हावुन गेले हे योग्य नाही. आज प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे .त्याप्रमाणे काही अपघात ही झाले की त्यामध्ये कुटुंबातील आधार आपल्यातुन निघून गेले त्याला जबाबदार कोण तरी आठ दिवसात खड्डे भरुन न झाल्यास चिपळुण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल अशी परखड भूमिका मांडण्यात आली.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, जयद्रथ खताते, शौकत मुकादम, किशोर रेडिज, चित्रा चव्हाण, दिशा दाभोलकर, हिंदूराव पवार, मुराद अडरेकर, शांतीलाल ओसवाल, आदिती देशपांडे, रुक्सार अलवी, राजाभाऊ चालके, रफीक मोड़क, सीमाताई चालके, पूनम भोजने, विलास महाडिक,नितीन ओसवाल,खालिद दाभोलकर, अविनाश हरदारे, समीर पवार, कादिर परकार, इम्रान कोंडकरी, छोटू कोलगे, राजू शिंदे, सचिन शिंदे,प्रकाश पवार, प्रसन्ना आंवले, बरकत पाते, कादिर मुकादम, विनायक पाटेकर, मुबीन माटवणकर, खालिद पटाइत त्याच प्रमाने शहरातील बहुसंख्य व्यापारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.