आशाताई बच्छाव
जिंतूर तालुक्यातील कावी, घागरा, दहेगाव कोरवाडी, वडी,वाघी, सावंगी (भां) येथील परिसरातून सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
शुक्रवारी रात्री सात च्या दरम्यान एक तास ढगफुटी सद्रुश पाऊस तसेच शनिवारी दुपारी तीन च्या दरम्यान देखील परत ढगफुटी सद्रुश पाऊस झाला
शेतकरी वर्गाकडुन तात्काळ मदतीची मागणी
जिंतूर :-तालुक्यातील सावंगी भांबळे,कावी,कोरवाडी, दहेगाव घागरा,वाघी,वडी,आणि तालुक्यातील बर्याच भागात मागील एक महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे वाढ थांबून सर्व जमिनीनी पाणी धरल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे या मुळे बहुतांश शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत आणि पीक पिवळे पडत आहेत या मध्ये सोयाबीन ,तूर ,कापूस इतर पिकांचा समावेश आहे जून महिना कोरडा गेला होता शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेर्णिला सुरुवात केली मात्र जेव्हापासून शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हा पासून पाऊस थांबायला तयार नाही पावसाच्या आगमनासाठी व्याकुळ झालेला बळीराजा मागील एक महिन्यांपासून चालू असलेल्या पावसामुळे त्रस्त झाला आहे
काही शेतकर्यानी केली दुबार पेरणी
तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी एकदा पेरणी केल्या नंतर ही सोयाबीन निघाले नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असतांना देखील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते कसे बसे ते पीक जमिनीतून वर निघाले तेव्हा पासून पाऊस सुरू झाला तर अजूनही चालूच आहे परिणामी पिकांचे आधिक नुकसान झाले आहेत आणि वाढ देखील खुंटली आहे त्यामुळे बळीराजा आधिकच हवालदिल झाला आहे …त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी असे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे …
प्रतिक्रिया:- मी माझ्या शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली आहे एवढे महागामो लाचे बी शेतात पेरले नेमकेच अंकुर वर आले होते तेव्हापासून सततच्या पाऊस चालू असल्यामुळे आमचे शेतात पूर्ण पाणीच पाणी झाले आहे आणि माझ्या शेतातील पीक पूर्ण पने पिवळे झाले आहे आणि करपत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ आमच्या शेतातील नुकसान ग्रस्त पिकांचा पंचनामा करून आम्हाला हेक्टरी पन्नास हजाराची मदत करावी …
भानुदास मोरे -सावंगी भांबळे ,डिगांबर लिपणे -कावी, धनेश काठमोरे-कावी,संदिप तरटे-कावी