आशाताई बच्छाव
पंढरीच्या वारीहून परतलेल्या भाविकांचा गुरूंच्या हस्ते सत्कार.
नायगाव तालुका प्रतिनिधि निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय.. च्या जयघोषात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात गेलेल्या प्रत्येक वारकरी विठ्ठलाचे पदस्पर्श अन् मुखदर्शन घेऊन धन्य झालो असल्याचे पंढरी च्या वारी हून परतलेल्या भक्तांनी आपला अनुभव सांगितला. वारीमध्ये भक्तिरसात तल्लीन होऊन विठू नामाचा गजर करीत कधी वेळ गेला ते लक्षात सुद्धा आले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश , तेलंगणा राज्यातील भावीकानी मोठ्या प्रमाणात वारीला जात असतात. दोन वर्षाच्या कोरोणा महामारिमुळे भक्तांना वारीला जाता आले नाही मात्र येवेळेस त्यानी भक्ती भावपूर्ण वारी सफल झाल्याचे बोलून दाखवले.
वारी पूर्ण झाल्यानंतर भाविक आपापल्या गावी परतले आहेत. नायगाव तालुक्यातील देगाव येथील वारकरी परतल्या नंतर दत्त मठ संस्थान चे मठपती गुरू गंगाबन महाराज यांनी वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी गंगाधर सावरगावे,बालाजी कदम, सतीश वाडे, मनोज बच्चेवार, ओमकार पाटिल, राजेश्वर बच्चेवार, ज्ञानेश्वर आकले, सुनीता कदम,ललिता बच्चेवार, शंकर मोरे आदी वारकरी उपस्थित होते.