Home Breaking News रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन

रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन

107
0

🛑 रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन🛑
✍️(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी:⭕ लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
चिपळूण : लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊन काळात रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम केशकर्तनालय चालक, मालक, कारागीर यांनी शासनाला सहकार्य करताना आपली दुकाने बंद ठेवली. परंतु, शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिलेली नाही.

नाभिक समाजाचा उदरनिर्वाह पारंपरिक नाभिक व्यवसायावरच अवलंबून आहे. या समाजातील ९० टक्के लोकांकडे शेती नाही, अनेकांची दुकानेही भाडेपट्ट्याने घेतलेली आहेत. समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लॉकडाऊन आणि उपासमारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये जिल्हा नाभिक संघाची तातडीची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले.⭕

Previous articleIIT च्या माजी विद्यार्थ्यांचे ड्रोन यशस्वी
Next articleसटाणा तालुक्यात जोरदार प्रर्जन्यवृष्टी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here