आशाताई बच्छाव
शिक्षकांना शाळा अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर
युवा मराठा न्यूज नेटवर्क
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त शाळा बाह्य मतदार नोंदणीच्या कामांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अतोनात नुकसान होत आहे
सलग दोन वर्ष कोरोणा या महामारीमुळे बहुतेक शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना घरी ऑनलाईन अभ्यास करावा लागत होता. परंतु बहुतेक मुलांकडे मोबाईल नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिले होते. पण मात्र कोरोनाचे प्रमाण कमी झाले व शाळा पूर्व सुरू झाल्या पुन्हा विद्यार्थी शाळेत येऊ लागले. पण मात्र बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक संख्या प्रमाणापेक्षा कमी आहे काही शाळांमध्ये एक दोन शिक्षक एक ते चार वर्ग सांभाळतात. अध्यापनाचे काम करताना अशातच शासनाने नेमून दिलेल्या मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे(BLO) या नियुक्तीमुळे शिक्षकांना आपला वर्ग सोडून आपले अध्यापनाचे काम सोडून या मतदार नोंदणी याद्यांचे काम करावे लागते. साहजिकच उर्वरित शिक्षकांना वर्ग सांभाळावा लागतो. अर्थातच मुलांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठ नुकत्याच आदेश जाहीर केला की शालेय कामकाजा दरम्यान शिक्षकांना निवडणुकीचे कामे देता येणार नाही. या आदेशाचे महाराष्ट्रभर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा सर्वच शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकडून होत आहे तसेच पूर्णवेळ शिक्षकांना अध्यापनासाठी देण्यात यावा.या मतदार नोंदणीचे कामे इतरत्र शासकीय कर्मचारी यांच्याकडे देण्यात यावे जेणेकरून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही……